Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

लाल बहादूर शास्त्री - लहान मुलांसाठी मराठी भाषण | Lal Bahadur Shastri | Speech for Kids

 


"लाल बहादूर शास्त्री "    

मराठीत एक म्हण आहे "मूर्ती लहान पण कीर्ती महान".  हि म्हण जर कोणाला समर्पक बसत असेल तर ती व्यक्ती म्हणजे " लाल बहादूर शास्त्री". अंगकाठीने लहान असले तरी शास्त्रीजींची कारकीर्द खूप महान अशी होती. त्यांचा स्वभाव खूप मृदू होता. मन संवेदनशील होते. गांधीजींच्या विचारांचा त्यांचा मनावर खूप मोठा प्रभाव होता. पण जर भारतभूमीवर कोणी आक्रमण करणार असेल तर खंबीर पाने त्यांना जशास तसे कसे उत्तर द्यावे हे सुद्धा "शास्त्रीजींनी" जगाला दाखवून दिले.

लाल बहादूर शास्त्री यांचे खरे नाव " लाल बहादुर श्रीवास्तव" असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव शरद प्रसाद आणि आईचे नाव रामदुलारी देवी असे होते. शास्त्रीजींचा जन्म ऑक्टोबर १९०४ रोजी मुगलसराई हिथे झाला. योगायोग म्हणजे शास्त्रीजी ज्यांना आपले आदर्श मानत अश्या महात्मा गांधी यांचा सुद्धा जन्म " ऑक्टोबर" चाच.  

लाल बहादूर शास्त्री फक्त दिड वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले त्यामुळे ते आणि त्यांचे कुटुंब त्यांच्या आजोळी येऊन राहू लागले. त्यांचे शिक्षण तिथेच झाले. माध्यमिक शाळेत असताना शास्त्रीजींना "निष्कामेश्वर प्रसाद " नावाचे शिक्षक होते.  त्यांचा शास्त्रीजींवर फार जीव होता. त्यांच्या हाताखाली शिकत असताना शास्त्रीजींनी प्रखर देशप्रेमाची अनुभूती झाली. तेव्हा पासून त्यांच्या मनात देशासाठी काहीतरी करायची इच्छा प्रबळ होत होती. त्यातच गुरुजींमुळे त्यांना " महात्मा गांधी" आणि " स्वामी विवेकानंद" ह्यांच्या विचारांची ओळख झाली. आणि ते गांधीजींना आपले आदर्श मानू लागले.

लाल बहादूर शास्त्री जेव्हा १६ वर्षाचे होते तेव्हा इंग्रजांविरुद्ध गांधीजींनी "असहकार चळवळ" चालू केली होती. अवघ्या १६ व्या वर्षी शास्त्रीजींनी स्वातंत्रलढ्यात  भाग घेतला. १० विची परीक्षा तोंडावर असताना त्यांनी आंदोलनात भाग घेतला आणि त्यांना अटक सुद्धा झाली. पण वयाने लहान असल्याने त्यांना सोडून दिले  गेले. पण शास्त्रीजींनी काँग्रेस सोबत काम करायला सुरुवात केली. ते " लोक सेवक मंडल" सभासद झाले आणि हरिजनांसाठी काम करू लागले.

त्या काळची जातिप्रथा त्यांना मान्य नव्हती म्हणू त्यांनी आपले " श्रीवास्तव" हे जातीवाचक आडनाव काढून टाकले. काशी विद्यापीठातून त्यांना "शास्त्री" हि  पदवी मिळाली आणि तीच पुढे त्यांच्या नावाला लागली.

लाल बहादूर शास्त्री यांना भारतातल्या अनेक जुन्या अन्यायकारक प्रथा मान्य नव्हत्या. त्यापैकी एक म्हणजे " हुंडा घेणे". एका लग्नात त्यांनी पाहिले कि हुंडा फारसा दिला नाही म्हणून नवऱ्याकडची माणसे नवरीच्या कुटुंबीयांचा अपमान करत होते. लाल बहादूर शास्त्रींना ते सहन नाही झाले. त्यांनी ठरवले कि मी लग्न कारेन तेव्हा मी अजिबात हुंडा घेणार नाही. त्यांच्या लग्नाच्या वेळी त्यांनी त्यांची पत्नी "ललिता देवी" ह्यांच्या घरच्यांना सांगितले कि मी हुंडा घेणार नाही. ललिता देवी ह्यांच्या घरातल्यानां आश्चर्य वाटले. ते म्हणणे असे करू नका , आम्ही आमच्या मुलींसाठी स्व-खुशीने काही तरी देतो. पण शास्त्रीजी ऐकायला तयार नव्हते.  शेवटी ते म्हणाले " जर द्यायचाच आहे तर चरखा द्या आणि मुलीची पाठवणी करा" त्याकाळी चरख्याला स्वदेशी चळवळीत खूप महत्व होते. असे मोठ्या मनाचे होते लाल बहादूर शास्त्री. 

२७ मे १९६४ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले. त्यामुळे भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून " लाल बहादूर शास्त्री" यांची निवड करण्यात आली. पंडितजींच्या निधनामुळे भारत आता कमकुवत झाला आहे असे समजून पाकिस्तान ने भारताशी अचानक युद्ध सुरु केले. सर्वाना वाटले कि शास्त्रीजी मवाळ स्वभावाचे आहेत. त्यामुळे पाकिस्तान भारताला भारी पडेल. पण भारतीय सैन्य आणि लाल बहादूर शास्त्री आणि आपल्या कणखर स्वभावाचा परिचय देत पाकिस्थान खडे चारले. त्याचवेळी भारतात खूप अन्न टंचाई निर्माण झाली होती. एकीकडे युद्ध आणि एकीकडे अन्नटंचाई यामुळे सरकार दुविधेत सापडले होते.

जेव्हा तिन्ही भारतीय सैन्य प्रमुखांची आणि लाल बहादूर शास्त्री यांची बैठक झाली तेव्हा सर्व सैन्यदल प्रमुखांनी त्यांना विचारले
" सर , काय ऑर्डर्स आहेत तुमच्या ?'

शास्त्री जी म्हणाले " काहीही झाले तरी माझ्या भारतभूमीचे रक्षण करा. तुम्हाला माझी परवानगी आहे. आणि आम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा सांगा. भारतभूमी पेक्षा मोठ्ठ काहीच नाही" 

शास्त्रीजींनी भारतीय सैन्याला मोकळीक दिली. सैनिक आणि शेतकरी ह्याचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी " जय जवान जय किसान" चा नारा दिला. लाल बहादूर शास्त्रीजीं असे काही करतील अशी पाकिस्तान ला अपेक्षाच नव्हती. पाकिस्तान चा पराभव झाला. त्यामुळे संपूर्ण जगासमोर भारताची मान  उंचावली.  

अश्या ह्या महान नेत्याचे ११ जानेवारी १९६६ रोजी निधन झाले आणि भारताने एक संवेदनशील, हळवा पण तितकाच कणखर नेता गमावला. पण आजही भाताच्या इतिहासात आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात " लाल बहादूर शास्त्री" यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरलेले आहे.

अश्या ह्या महान " लाल बहादूर शास्त्री" ह्यांना विनम्र अभिवादन करतो. 

अजून वाचा :  महात्मा गांधी - लहान मुलांसाठी मराठी भाषण

लोकमान्य टिळक - लहान मुलांसाठी मराठी भाषण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या